Wednesday, November 24, 2010

मुख्यमंत्र्यांचा दिवस

भारताच्या राजकारणात कालचा दिवस मुख्यमंत्र्यांचा ठरला. बिहारातील विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने विक्रमी बहुमत मिळवत एकछत्री अंमल प्रस्थापित केला.
कॉंग्रेस, राजद-लोजपा यांचा धुव्वा उडवत परत एकदा नितीशकुमारांनी सत्ता मिळवली आहे. भाजप हा नितीशकुमारांचा (जद(सं)) सत्तेतील भागीदार. कॉंग्रेस ची संख्या ९ वरुन ४ झाली. लालुप्रसादांच्या कंदिलाचा प्रकाश मंदावला आहे. त्यांचे संख्याबळ ४३ चे २२ झाले. रामविलास पासवानांचे तर फ़क्त ३ उमेदवार निवडुन आलेत. कॉंग्रेस, राजद-लोजपा यांना अस्मान दाखवुन सत्ताकारणात ’विकास’ हा महत्वाचा मुद्दा आहे हे बिहारी जनतेने जाणवुन दिले आहे. महाराष्ट्राच्या नेत्यांनी यातुन काय तो बोध घ्यावा.

आंध्रात रोसय्या गेले; किरण रेड्डी आले
प्रकृतीचे कारण देत आंध्र प्रदेशात कॉंग्रेसचे मुख्यमंत्री रोसय्या यांनी राजीनामा दिला. जगनमोहन यांना मुख्यमंत्री पदाची असलेली घाई, आधी अम्मा असा ज्यांचा उल्लेख केला त्या सोनिया गांधींवर जगनमोहन यांच्या साक्षी वाहिनीने टिका केली. आधीच जगनमोहन यांना फ़ारसे अनुकुल नसलेले मत त्यांच्या विरोधात गेले. रोसय्यांची गच्छंती त्यांच्या सरकारच्या निष्क्रियतेमुळे झाली. रोसय्याचे उत्तराधिकारी म्हणून विधानसभा अध्यक्ष किरणकुमार रेड्डी यांचे नाव निश्‍चित झाले.

कर्नाटकात येदियुरप्पा राहिले
कर्नाटकात भाजपचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी पक्षश्रेष्ठींना आपल्यापुढे नमायला लावून मुख्यमंत्रीपद शाबूत राखले आहे. येदियुरप्पा हे सरकारी भूखंडाचे नातेवाईकांना केलेल्या वाटपावरून अडचणीत आले होते. त्यांची मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्याचे संकेत भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दिले होते. पण येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपद टिकवले आहे.
पहिला दक्षिण दिग्विजय मिळवुन देणाऱ्या सुभेदाराने आपला स्वतंत्र सवतासुभा निर्माण केल्याचे स्पष्ट झाले.
'A party with a difference' असलेला भाजप ने आपले पाय मातीचेच आहेत परत एकवार दाखवुन दिले.

No comments: