Sunday, November 04, 2007

कॉल सेंटरचा बळी

ज्योतीवर जो प्रसंग ओढ्वलेला प्रसंग दुर्दैवी आहे. ज्योतीच्या मारेकऱ्यांना फ़ाशी द्या, किंवा जीवंत जाळा..कंपनीवर FIR दाखल करा. ह्या सगळ्या मलमपट्ट्या आहेत, याने प्रश्न सुटणार नाहीय.
प्रश्न हा आहे की इतर कोणीतरी ज्योती होऊ नये त्यासाठी काय करायचे?
गुन्हेगारांना फ़ाशी द्यायची? हा न्याय आहे की सूड? (मी मानवाधिकार वाला नाही, माझे मत आहे की त्यांना फ़ाशी व्हायला हवी.) पण फ़ाशी ने इतर गुन्हेगारांना जरब बसते? २००४ मधे धनंजय चॅटर्जी ला असल्याच गुन्ह्यासाठी फ़ाशी दिली, तरिही ही घटना घडलीच. गुन्हेगारांना शिक्षा व्हायलाच हवी, कारण त्यांनी समाजाने मान्य केलेले नियम मोडलेले आहेत. पण परत तेच, हा कायम स्वरूपी इलाज नाही.
ज्योती कॉल सेंटरचा बळी नाही, घटना घडताना ज्योती कॅब ऎवजी एखाद्या दुसऱ्या गाडीत असती तर? स्त्री कडे पाहण्याचा जो attitude आहे, ज्योती त्याचा बळी आहे.
मला वाटते याला उपाय आहे, तो म्हणजे प्रशिक्षण ’पुरुषांचे प्रशिक्षण’.
पुरुषांचा स्त्रीकडे पाहण्याचा attitude जोवर एक ’भोग्य’ असा आहे तोवर या घटना घडणारच. या प्रशिक्षणाची गरज समाजातल्या सर्व स्तरातल्या (आर्थिक आणि सामाजिक) पुरुषांना आहे. ही दिर्घकाळ चालणारी procedure आहे, पण ती सुरु व्हायलाच हवी.
कॉल सेंटर मधे काम करणाऱ्या स्त्रीयांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच पुढे येतो. ही जबाबदारी सर्वांची आहे. कंपनी व्यवस्थापनाने सुरक्षेचे नियम कठोरतेने पाळल्या जात आहेत की नाही हे पहायला हवे. ज्याप्रमाणे कर्मचाऱ्याचे background verification होते त्याप्रमाणे वाहनचालक, सुरक्षा कर्मचारी यांचे पण background verification करावे. संबंधीत कर्मचाऱ्याने पण सुरक्षेचे नियम पाळावेत.उदा. वाहनचालकाला ठरलेल्या मार्गाऐवजी दुसरी कडे गाडी नेण्याची परवानगी देउ नये किंवा स्वत: कर्मचाऱ्याने मार्ग बदलण्याची सुचना देउ नये.

Saturday, October 13, 2007

दक्षिणेतला मराठी सराफ

आजचा सकाळ वाचला आणि डोळे धन्य धन्य जाहले.अरे काय हे, तुम्हीच ही बातमी वाचा.
..........
तिरुअनंतपुरम (केरळ), ता. १० - त्रिसूरमधील एका मराठी सराफाला ८५ लाख रुपयांना लुबाडणाऱ्या टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
.......


मराठी माणुस पश्चिमेला पार साता समुद्रापार पोचला. पुर्वेकडेहि मराठी ऐकु येउ शकते. मराठी माणुस उत्तरेकडे (उत्तरेकडे म्हणजे उत्तर दिशेला, उत्तराकडे फ़क्त अर्जुन गेला होता, तेहि ब्रुहन्नडा म्हणुन)गेल्याचे माहित आहे, शिवाजीने औरंगजेबाला ठेंगा दाखवला, राघोबाने अटक (सांप्रत पाकिस्तान) मारली.मध्य भारतात इंदोर, जबलपुर, ग्वाल्हेर, कानपुर येथे नागपुरपेक्षा जास्त मराठी ऐकु येते. आता तर काय राष्ट्रपती भवनातही मराठी ऐकायला येणार.पण दक्षिणेत कोणी मराठी गेल्याचे ऐकु आले नाहि, नाही म्हणायला शहाजी राजे तंजावरला होते, पण त्यानंतर सगळा अंधार, येथले राजकारणी पाहिले कि वाटते रामसेतु बांधायला कोणी गेले नव्हते ह्याचा पुरावा काय? शिवाय 'बचेंगे तो और भी लढेंगे' म्हणणार्‍या दत्ताजी शिंदेचे वारस आपण त्यामुळे रामाच्या सेनेत शिलेदार म्हणुनही मराठी असु शकतात, शिवाय नोकरी अतीप्रिय ना आपल्याला मग ती शिपायाची का असेना?
'नायक' या अनिल कपूरच्या चित्रपटात मराठी पोरीचा बाप अनिल कपूरला नकार देताना म्हणतो ,"१ रुपया तनखा वाली चलेगी पर सरकारी नोकरी चाहिये."हे वाक्य पुरेसे बोलके आहे.
यापलिकडे दक्षिण दिशा सतत रिक्तच. उलट उत्तरेतले आणि दक्षिणेतले आम्हालाच गंडवतात शिवाय आम्हालाच मुंबईत 'मुंबई तुमची...' अणि नागपुरात 'लोटा लेके आये थे..' असे ऐकावे लागते.
सातासमुद्रापार गुरुराज देशपांडे वगैरे प्रभ्रुतींनी झेन्डे रोवलेत, पण खाली दक्षिणेत व्यापार करणारा आणि ८५ लाखाने गंडवल्या जाऊ शकणार्‍या मराठी माणसाचे, हार्दिक अभिनंदन
दक्षिणेत गेला म्हणुन नोकरी न करता व्यापार केला म्हणुन, फ़क्त ती गंडवुन घ्यायची परंपरा त्यांनी तशीच ठेवली, ती परंपरा बदलेल तो सुदिन.

Monday, October 08, 2007

’गोपाळकाला’ च का?

"तू लिहित का नाहिस?", एक दिवस ठेल्यावर पानाची पिचकारी मारुन गण्या बोलला. तो कदाचित माझ्या वटवटिला कन्टाळला होता.
"काय लिहिणार?" "काहिही"
म्हणुन ब्लॉग लिहायचे ठरवले.
ब्लॉग ला नाव काय देणार?
सवाल लाखाचा समोर आला.
विषयाचे बन्धन जर लिखाणाला नाहि तर ब्लॉगचे नाव पण तसेच बन्धमुक्त हवे.
’गोपाळकाला’ या पेक्षा जास्त योग्य नाव काय आहे?
गोपाळकाल्यामध्ये जसे सगळे पदार्थ असतात, तसेच या नोन्द्स्थळावर (पक्षी:ब्लॉग) सूर्याखालील कोणताही विषय असु शकेल....
भाकरी ते बॅले... कोठलाही विषय.

-आपला
कलंदर