Sunday, November 04, 2007

कॉल सेंटरचा बळी

ज्योतीवर जो प्रसंग ओढ्वलेला प्रसंग दुर्दैवी आहे. ज्योतीच्या मारेकऱ्यांना फ़ाशी द्या, किंवा जीवंत जाळा..कंपनीवर FIR दाखल करा. ह्या सगळ्या मलमपट्ट्या आहेत, याने प्रश्न सुटणार नाहीय.
प्रश्न हा आहे की इतर कोणीतरी ज्योती होऊ नये त्यासाठी काय करायचे?
गुन्हेगारांना फ़ाशी द्यायची? हा न्याय आहे की सूड? (मी मानवाधिकार वाला नाही, माझे मत आहे की त्यांना फ़ाशी व्हायला हवी.) पण फ़ाशी ने इतर गुन्हेगारांना जरब बसते? २००४ मधे धनंजय चॅटर्जी ला असल्याच गुन्ह्यासाठी फ़ाशी दिली, तरिही ही घटना घडलीच. गुन्हेगारांना शिक्षा व्हायलाच हवी, कारण त्यांनी समाजाने मान्य केलेले नियम मोडलेले आहेत. पण परत तेच, हा कायम स्वरूपी इलाज नाही.
ज्योती कॉल सेंटरचा बळी नाही, घटना घडताना ज्योती कॅब ऎवजी एखाद्या दुसऱ्या गाडीत असती तर? स्त्री कडे पाहण्याचा जो attitude आहे, ज्योती त्याचा बळी आहे.
मला वाटते याला उपाय आहे, तो म्हणजे प्रशिक्षण ’पुरुषांचे प्रशिक्षण’.
पुरुषांचा स्त्रीकडे पाहण्याचा attitude जोवर एक ’भोग्य’ असा आहे तोवर या घटना घडणारच. या प्रशिक्षणाची गरज समाजातल्या सर्व स्तरातल्या (आर्थिक आणि सामाजिक) पुरुषांना आहे. ही दिर्घकाळ चालणारी procedure आहे, पण ती सुरु व्हायलाच हवी.
कॉल सेंटर मधे काम करणाऱ्या स्त्रीयांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच पुढे येतो. ही जबाबदारी सर्वांची आहे. कंपनी व्यवस्थापनाने सुरक्षेचे नियम कठोरतेने पाळल्या जात आहेत की नाही हे पहायला हवे. ज्याप्रमाणे कर्मचाऱ्याचे background verification होते त्याप्रमाणे वाहनचालक, सुरक्षा कर्मचारी यांचे पण background verification करावे. संबंधीत कर्मचाऱ्याने पण सुरक्षेचे नियम पाळावेत.उदा. वाहनचालकाला ठरलेल्या मार्गाऐवजी दुसरी कडे गाडी नेण्याची परवानगी देउ नये किंवा स्वत: कर्मचाऱ्याने मार्ग बदलण्याची सुचना देउ नये.